Friday, April 29, 2011

||बोलावा विठ्ठल ||

प्रती
उद्धव साहेब आणि राज साहेब
जयमहाराष्ट्र ,
आज सकाळीच एक मित्र आला गप्पा मारता मारता म्हणाला
आजचे नेते काय करतात माहित आहे का?
ईन्ग्र्जित एक म्हण आहे ,
"ईफ यु कुड नॉट कन्विन्स देम कन्फ्युज देम"
तो गेला आणि मी पेपर उघडला तर त्यात ,
"महाराष्ट्र एकीकरण समितीची" 

जाहिरात उद्या ३० मी रोजी
सारे जे महाराष्ट्र वादी आहे ज्यांना वाटत कि 

बेळगाव कारवार सह
संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशांनी आझाद मैदानात एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणास जमावे ,,,,,,
(मला वाटत या पेक्षा वेगळ दुखः ते काय कि एकीकरण समितीला जाहिरात द्यावी

लागावी?)
आणि ठरवल उद्या जायचं म्हणून कामाला बाहेर पडलो तर ,,,,,,
सगळीकडे उद्धव साहेबांचे पोस्टर्स बाहेर लागलेले ,,,,,
"पाहावा विठ्ठल " ती तारीख हि ३० एप्रिल च?
सहजच विचार आला मग उद्धव साहेब कसे येणार लाक्षणिक उपोषणाला ?
कि येणारच नाहीत?
जैतापुरला जेव्हा दंगल झाली तेव्हा ते बाहेर होते त्यावेळी
पत्रकारांनी जेव्हा त्यांना विचारलं कि तुम्ही कुठे होतात?
ते ते म्हणाले होते मी आंदोलनावर बारीक लक्ष ठेवून आहे ,,,,,,,,,
आणि आहे हि ,,,,,,,,,असो,
मग उद्धव साहेब  ह्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनावर बारीक
लक्ष ठेवून आहेत का?
सहज विचार मनात आला ,,,,,,
पाहावा विठल च्या ऐवजी बोलावा विठ्ठल असा का बोलावेसे वाटले नाही?
आज समितीला उपोषणाला हजार राहावे म्हणून
महाराष्ट्रीय जनतेला जाहिरातब देवून कळवावे लागते
ह्या पेक्षा लाजिरवाणी गोष्ट ती काय?

सीमा भाग महाराष्ट्र विलीन झाल्या शिवाय आम्हाला १ मे महाराष्ट्र दिन 
महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव साजरा तरी कसा करता येईल?
आणि का करावा?
लाखो मराठी बांधव कर्नाटकी वरवंट्या खाली गेली ६० वर्षे  भरडले जात आहेत

४१ वर्षे लोकसभेसमोर ,७ वर्षे सर्वोच्च न्यायालयात ते लढा देत आहेत
महारष्ट्र कर्नाटक सीमेवरची आज मराठी संस्कृती नष्ट होवू पाहत आहे.
कानडी सरकारचा वरवंटा आणि महराष्ट्र सरकारची उदासीनता

हि मराठी माणसाची डोळेझाक किती दिवस चालणार ? 
आणि आम्ही ईकडे सुवर्ण महोत्सव साजरा करावा ?
उद्या १ मेला सार फेस बुक कदाचित महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छांनी भरून जाईल
पण मला वाटत या अशा ईकडे शुभेच्छा देण्या आधी आपण सारे
उद्या मराठी बांधवांचे हात बळकट करण्यासाठी आझाद मैदानावर
एकत्र जमणे श्रेयस्कर होईल ,,,,,,,,
कारण उद्धव साहेबांना त्यांना त्यांचा विठ्ठल फक्त पाहायचा आहे ,,,
आणि राज साहेबांचा विठ्ठल तर काय बडव्यांनी झाकून टाकलाय,,,,,
कुणालाच तो सीमाभागात अडकलेला विठ्ठल सोडवायची ईच्छा नाही ,,,
त्याच्या बाजूने बोलायची ईच्छा नाही ,,,,
त्यासाठी तुरुंगात जायची ईच्छा नाही,,
बस स्वतःचे झेंडे नाचवले म्हणजे झाले काय?
उद्धव साहेब , राज साहेब खरच आपणा दोघास कळकळीची विनंती आहे
तुम्हा दोघांच जे काही असेल भांडण ते असच चालू ठेवा
परंतु सीमा प्रश्नावर दोघा हि एकत्र या खूप खूप गरज आहे
उद्धव साहेब आता हि हवाई उड्डाण ,,,
आणि राज साहेब आता हि मनसे गिरी,,,,,
थोडी थांबवा आणि आम्हाला खरच कन्फ्युज नका करू
आम्ही तुमच्या शब्दा बाहेर नाही ,,,,,,,
अहो उद्धव साहेब आज जरी हिंदुत्वाचा झेंडा हाती असला तरी
पाया खाली मराठी गडाला जातोय तो मराठीच याच हि भान ठेवा ,,,,
राज साहेब हा जरी सीमा भाग कर्नाटकात असला तरी
येथे कानडी मुलखा विरुद्ध भांडणारा देखील मराठीच आहे
हा महाराष्ट्रातला नाही अशी कृपया वर्गवारी नका करू,,,,,,
कृपया सीमाभागातल्या लोकांना खूप खूप अपेक्षा आहे तुमच्या कडून
आणि तुम्ही दोघ हि आपापले झेंडे नाचवत बसणार असाल तर,,,,,,?

फक्त पाहावा विठ्ठल नको तर बोलावा विठ्ठल होवू द्या
सीमा बांधवांच्या बाजूने बोला त्यांची कड घ्या,, 

या मराठी जनतेने आशेने कुणाकडे पाहायचे काँग्रेस कडे,,,,,?
पण येथे सारेच उदासीन अगदी सार्या मराठी बांधवांची आज मराठी विषयी
विचार काय तर हि भाषा आता गडी नोकरांची आहे ,,,,,,
येथले लोक आज हिंदी ईंग्लीश मध्ये केवळ बोलतच नाहीत तर विचार हि
ईंग्लीश मध्येच करतात ,,,,,
आज काल कर्नाटकात
बरेच ठिकाणी बोर्ड लावलेत ,
"कन्नड बोलाल तर काम लवकर होईल"
याचाच अर्थ
"याद राखा मराठी बोलाल तर काम होणार नाहीत"
येथे मराठीचे झेंडे नाचवायचे ब्यानारबाजी करायची
स्वतःचे फोटू छापून घ्यायचे,
कुसुमाग्रजांच्या, सुरेश भटांच्या त्यावर ओळी त्यांना न विचारता लावायच्या .
जात पंथ धर्म एक मानतो मराठी काय नि काय?
सब घोडे बारा टके,,,,
आज नेमक सीमा भागाची अवस्था आहे?
लोकशाहीची संकल्पना जगभर रुजत असताना
नेमकी सीमाभागात मराठी लोकांची राजरोस पणे सर्वच ठिकाणी गळचेपी केली जात आहे .
आणि महाराष्ट्र सरकार ,विरोधी पक्ष, केंद्र सरकार याकडे गांभीर्याने पाहायला तयारच नाहीत?
सर्व सरकारी कार्यालये, कागद पत्रे यांचे पद्धतशीर कानडीकरण केले जात आहे ,
मराठी कार्यकर्त्यांवर खुनासारखे गंभीर आरोप ठेवू त्यांना देशोधडीलीला लावले जात आहे,
२००४ नंतर तर यात आणखीनच वाढ झाली आहे कारण
महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला ,
बेळगाव हे कर्नाटकाचे आहे हे भासवण्यासाठी त्याचे
"बेळगावी "असा नामांतर करायचा असफल प्रयत्न झाला,
उपराजधानीचा दर्जा, विधानभवन ,
ब्रिटीशांच्या राजवटीत बेळगाव प्रांतांचा कारभार मराठीत चाले,
आज हि १९५६ च्या आगोदारची नोंदी मराठीतच आहेत ,
१९५६ नंतर कर्नाटक निर्मिती झाली
१९६१ पासून कन्नड आणि मराठी सर्व व्यवहार दोन भाषेत करू लागले .
आणि आता १९८३ पासून हा सारा व्यवहार कागद पत्रे
कानडीतुनच मिळतात .
पूर्वी दुकानाचे बोर्ड हि मराठी कानडी असत
आता केवळ कानडी,,,,,,
आणि वर सांगितल्या प्रमाणे आता कर्नाटकात
जागो जागी फलक लावलेत
" कानडीत बोलाल तर काम लवकर होईल"
मराठी कागद पत्राला सरळ केराची टोपली दाखवली जाते.
कायदा काय सांगतो,,,,,,,?
जर एखाद्या विशिष्ठ भागात एकच भाषा बोलणार्यांची संख्या
१५%हून जास्त असेल तर,,
त्यांना त्यांच्या भाषेत सरकारी कागद पत्रे उपलब्ध व्हावीत.
महसूल ,न्यायालये हि त्याच भाषेत चालवावी,
असा निकाल केद्र आणि राज्य ने मिळून दिला आहे.
आणि सीमा भागात मराठी बांधव तर ५०%च्या वर आहेत .
आणि तरीही अन्याय ?
कानडी आली तर छोकरी तर नोकरी
एव्हडी वाइट अवस्था आहें गेली कित्येक वर्षे
तिथले मराठी महाराष्ट्रात येवू पाहत आहेत .
ते ही मराठीच आहेत,,,महाराष्ट्र एकीकरण समिति
मराठीच्या न्याय हक्का साठी लढतेय
कुणी आजन्म
लग्नच करनार नाही अशी शपथ घेतलीय ..
कुणी पायात चप्पल घालणार नाही..
कोण दाढ़ीच करणार नाही..
कुणी गोड खाणार नाही ..
एक ना अनेक तर्हेने ते
कानडी सरकारचा निषेध करत आहेत
लढा देत आहेत .

आणि तिकडे पाटील पुटाप्पा  व त्याचं कौतुक कराव तितक कमीच
हडेलहप्पी,,दमदाटी,,,आदी सर्व मार्गांचा अवलंब
करून पाटील पुट्टापा यांनी कन्नडला तिच्या योग्य स्थानी
बसवले आहे त्यांची हि पद्धत चुकीची जरूर असेल पण
उद्दिष्ट ते मुळीच चुकीचे नाही,,,,,,,,,,,,,
कन्नडला एका उंचीवर नेवून बसवण्यात त्यांचा मोठा हात भार आहे
म्हणून कन्नडचे नाव आज गाजते आहे आणि,,,,,,,,,,,?
माय मराठीला अशाच मराठी पाटील पुट्टापा अवताराची गरज आहे.
आमच्या गावी हे नाही आम्ही सण साजरे करण्यात मश्गुल.... 
बघा राज साहेब उद्धव साहेब प्रत्यक्ष विठ्ठल स्वतः
पंढरपुरात भक्ताला भेटायला गेला होता आणि येथे ,,,,,,?
सीमा बांधव स्वतः तुमचा भक्त आहे तुमच्यातल्या विठ्लाला भेटायला तो
स्वतः आलाय निदान महाराष्ट्रात तरी त्यांना साथ द्या नव्हे नव्हे
आपली जी काही भांडण असतील वाद असतील ती सारी बाजूला ठेवून
त्यांच्या पाठीशी उभे राहा आम्ही तुमच्या बरोबर आहोतच
हे प्रत्यक्ष देवाच काम आहे कृपया त्यांना मदत करा
आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देईल हीच सदिच्छा
आपला सुनील भूमकर 


   


2 comments:

  1. उद्धव साहेब , राज साहेब खरच आपणा दोघास कळकळीची विनंती आहे
    तुम्हा दोघांच जे काही असेल भांडण ते असच चालू ठेवा
    परंतु सीमा प्रश्नावर दोघा हि एकत्र या खूप खूप गरज आहे
    उद्धव साहेब आता हि हवाई उड्डाण ,,,
    आणि राज साहेब आता हि मनसे गिरी,,,,,
    थोडी थांबवा आणि आम्हाला खरच कन्फ्युज नका करू
    आम्ही तुमच्या शब्दा बाहेर नाही ,,,,,,,

    ReplyDelete