Sunday, June 26, 2011

ढिगविजय नावाच अर्धवट घोड ,,,

|| श्री नथू रामाय नमः||
अश्वमेधाचा घोडा पुरातन काळात दिग्विजयासाठी बाहेर सोडत आणि
मग राजे लोक त्या घोड्याला अडवेल त्याच्याशी लढत आणि
त्याला नामोहरण करत त्याच्या राज्यावर आपला हक्क सांगत
पण कुठे तरी या विजयाला खीळ बसे  आणि त्या घोड्याला
बंदी करून त्याच्या राजाला हि कैद करून त्यला आपला मंडलिक करत
आणि आपल्या देशाचा झेंडा नाचवत असत . आणि ज्याने तो
अश्वमेधाचा घोडा सोडलेला असे त्याच्या विजयाला अशा तर्हेने खीळ बसत असे.......
आपले दिग्विजय सिंह असेच कॉंग्रेसने सोडलेलं घोड,,,,,,,,
राहुल बाबा पंतप्रधान बनण्यास अगदी योग्य असून अस काल परवा हा
ढिगविजय बरळला पण कुणी मनावर घेतलेलं दिसलं नाही तर पुन्हा
लूत भरलेल्या कुत्र्यान पायात गोंडा घोळावा तसा हा पुन्हा बरळला
जगाचा न्यायच असा ,,,,,,
जगाच्या कल्याणाचा विचार हा पुन्हा पुन्हा जनतेसमोर मांडावा लागतो .
थोर विचारवंतांच कामच आहेते ,,,,,
जग हे अज्ञानाने भारलेल असत,,,
आपल कल्याण काशात आहे ते त्या मूर्ख लोकांना काळात नसत.
म्हणूनच थोर मोठ्यांना जगाच्या कल्याणाचे विचार हे सतत बोलावेच लागतात .
नाही तरी आपल्याकडे " जगाच्या कल्याण संतांची विभूती"
असच बोलाल जात,,,,
जगाचा न्यायच असा ,,,,,,
आणि देशाच्या कल्याणाचा मार्ग ढिगविजय तुमच्या पेक्षा कुणाला ठावूक असणार.....?
आणि आम्हाला अभिमान आहे तुम्ही ते काम खूप
ईमाने ईतबारे करत आहात......
रोज हनुमान चालीसा वाचवा तसे तसे
राहुल एके राहुल राहुल दुने राहुल चा पाढा म्हणत आहात ,
म्हणजे बघा काल परवा कोणत्या तरी संस्थेने भावी पंतप्रधान
म्हणून कोणाला पसंती आहे याचा आढावा घेतला,,,,,
या जनमत पाहणीत  राहुलबाबाला ४६% लोकांनी राहुल बाबाला
कौल दिला ,,,,,,,म्हणजे बघा तुमची सूचना अगदी रास्त आहे,
हा आता कुणी नतद्रष्ट म्हणतील हा सर्व्हे तुम्हीच मॅनेज केला असेल,,
पण घाबरू नका आम्ही त्यावर मुळीच विश्वास ठेवणार नाही .
कारण त्याच बातमीत नरेंद्र मोदी यांना ५६% पंतप्रधान म्हणून कौल दिला आहे.
हे सार खोट धांदात खोट आहे असा शेरा तुम्ही मारला का नाही?
या सर्वेच्या मागे संघाचा हात आहे हे हि म्हणा,,,,
नाही तरी रामदेव बाबा आणि अण्णा हजारेंच्या मागे संघ आहे
असा शेरा मारलाच आहात .
शिवाय भाजपला पंतप्रधान पद मिळेल कस ?
त्यासाठी लोकसभेत भाजपला निर्विवाद बहुमत मिळायला हव .
ते कस शक्य आहे ? आज मुढे बाहेर पडू पाहत आहेत
आणि मुंढे यांच्या शिवाय भाजप ?
तेव्हा राहुल बाबा शिवाय पर्याय नाही ,,,,,,
बरोबर ना?
आणि तसाही सध्याच्या केंद्र सरकारवर जनता खुश नाही
मी सुद्धा नाही मग सुद्न्य जनता कशी असणार?
ज्या देशाचे पंतप्रधान ,अर्थ मंत्री ,रिझर्व बँकेचे गव्हर्नर
आणि नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष म्हणतात ,,
"महागाई कशी वाढते हे आम्हालाच काळात नाही "
त्या सरकारच्या कारभारावर कोण खुश असेल?
तेव्हा तुमची सूचना अगदी समयोचित आणि रास्त अशी आहे .
मॅडमना ताबडतोब सुचवा ,,,,,,
मॅडमनि मनमोहन सिंग यांना नजरेने जरी खुणावल तरी ते लगेच राजीनामा देतील,,,,,
देशात काही तरी नवीन घडामोड घडेल,,
वातावरण बदलेल, मुंढे लोकपाल अण्णा यांनी बोर झालोय आता ,
करून टाका राहुल बाबांना पंत्रधान ,,,,,,हो पण
त्या आधी त्यांना किमान लग्न करायला सांगा हो,
उद्या सवड नसेल कदाचित आणि झालच लग्न घाई गडबडीत
तर पुन्हा आरोप नको याही मागे भाजपा संघाचा हात आहे
काय आहे चाळीशी झाली त्यांची आता ,,,,,,,,,
मॅडमना सांगा बहु दो बहु दो असा नारा द्या
बहुमत दो असा नारा नको ..

3 comments:

  1. सुनिल, राहुल गांधी आता पंतप्रधान झाले तर लोकांचा त्यांच्या कर्तुव्या विषयीचा भ्रमाचा भोपळा लवकरच फुटेल. महाराष्ट्र टाईम्सच्या रविवार पुरवणीतला लेख कॉंग्रेसमधिल अंतर्गत कलहाच यथार्थ चित्र उभ करतो. तेव्हा सध्या वाट पाहाणे. मनमोहनसिंग दिसतात तसे साधेभोळे नसुन ते देखिल संधीची वाट पाहात आहेत हे विसरता कामा नये. त्यांना कमी समजणं ही चुक करु नये. बाकी तुझ्या लिखाणाचा मी आदर करतोच.

    ReplyDelete
  2. देवेंद्र अरे मी ती खिल्ली उडवली आहे राहुल बाबच समर्थन नाही केल पण त्याच बरोबर आपल कुठे चुकत आहे ते सांगायचा प्रयत्न केला आहे

    ReplyDelete
  3. आपले दिग्विजय सिंह असेच कॉंग्रेसने सोडलेलं घोड,,,,,,,,

    ReplyDelete