||श्री नथू रामाय नमः ||
निवडनुकिचा हंगाम आला आणि सर्वच पक्षातील
बंडखोरिला उत आला पण जिव्हारी लागली
ती शिवसेनेची बंडखोरी...
ह्या "ग्रेट महाराष्ट्र सर्कस" चा तमाशा पाहिल्यावर
असे वाटते "हेची फळ मम तपाला,,,, असे
म्हणत या सर्व हरामखोर राजकर्न्यान्ना
साष-टांग नमस्कार घालावासा वाटतो.
परवाच,, छात्रपतिंच्या मालिकेत ,
मिर्झा राजे यांचा जिव पापी औरंग्याने कपटाने
घेतलेला दाखवला.आणि मरता क्षणी ,,
मिर्झाना ,,छत्रपतिंचे बोल आठवतात ,
राजे....मिर्झाजी अहो इकड़े आमच्या महाराष्ट्रात ,
त्यांचा राजा सिंव्हासनावर बसावा म्हणुन
इथे लोक आपला जिव ही देतात ,,,आणि
तिकडे ,,राजाला सिंव्हासनावर बसता यावे
म्हणुन तो इतरांचे जिव घेतो तेहि कपटाने,
तो आप्त स्वकियांची गय करत नाही
तो तुमची काय करणार?
हे सार आठवून ,,,
पश्चातापाने मिर्झा मान टाकतात.
आणि ते सार पाहता पाहता झरकन
सगल्या घटना डोल्या समोर आठवल्या ,,
घोड़ खिंड लढवनारा-बाजी,
रायबच लग्न बाजूला ठेवणारा- तानाजी ,
शिवा काशिद,आणि असे अनेक
त्यानी त्यांच्या स्वार्थाचा विचार केला असता तर..
आज छ्त्रपतिंचे गोडवे गायले असते का?
या सार्या मावल्यानी काही अपेक्षा न ठेवता
छात्रपतिना मदत केली नसती तर ....
हो त्यानी अपेक्षा ठेवली,,
स्वभाषा,स्वधर्म ,आणि स्वराज्य ..
याचे रक्षण ..
यावर कुणी म्हणेल ,
ते छत्रपति होते आज कुणी आहेका त्या लायकीचे?
नसेलही पण आम्ही जनता सारे शिवसैनिक ,,
ज्यांच्या जिवावर तुम्ही सारे मोठे झालात,
तुम्हा सर्वांची काय लायकी होती?
कुणी कोंबडी चोर,
तर कुणी वार लावून जेवनारा ,
कुणाची सायकल देखिल घायची लायकी नव्हती,
कुणी जामसंडेकर (बोलताना ज्याची बोबडी वळते)
तर कुणाची ३ रुपयची स्लीपर घ्यायची लायकी नव्हती,
कुनाच धड शिक्षण नव्हत,
तर कुणाचा सूर्य १२ वाजल्या शिवाय उगवला नाही,
अशा सार्याना आम्हा सैनिकांच्या मदतीने बालासहेबानी
नव्हत्याचे होते केले..
तेच सारे हरामखोर त्यांच्या वार्धक्याचा फायदा घेत बंडखोरी करत आहेत .
स्वतःचे सवते सुभे करण्यात मशगुल झाले आहेत ,
आजची ही निवडणुक ज्यासाठी सारे
कमरेच सोडून
डोक्याला गुंडालायला तयार झालेत.
महाराष्ट्र ही,,
कमअस्सल औलाद कशी काय पोसू लागला ?
केवळ सत्ते साठी?
अरे निलाजर्यानो,
निदान हे सार करताना
साधा विचार करायचा होता
की या आपसातील लाथाल्या बंडाल्यानी
देव न करो हे राज्य जर,,
उपर्यांच्या हातात गेल तर,,,?
तुम्हालाच मंत्रालयात जावून मराठी
माणसाच्या व्यथा सांगाव्या लागल्या तर..?
आणि मुख्यमंत्रीपदी कुणी निरुपम बसला असला तर.. ?
पण ,,,
आमच्या लक्षात आले तुम्हाला
स्वभाषा,स्वधर्म ,आणि स्वराज्य यांच्याशी काहीच
घेन देन उरलेल नाही.
तुम्ही सारेच
दुहिच्या शापाचे पाहिले मानकरी आहात.
No comments:
Post a Comment