Saturday, February 27, 2010

बेताल पंचविशी अर्थात,,,

 ||श्री नथू रामाय नमः ||
बेताल  पंचविशी अर्थात,,,

वेताळ पंचविशी ,,,
लहानपणी चन्दोबातल्या गोष्टी आवर्जुन वाचत असे
आणि वेताळ पंचविशी ,,,ती तर खासच 
आणि का कुणास ठावुक 
काल राहुलजीजीजीजी  गंधिजिजीजी आले 
ते आले त्यानी 
सांमना एक हाती जिंकला असेच एकंदर दिवस भराचे चित्र होते
ते चित्र उराशी कवटालूंन  मी झोपी गेलो (आम्ही जागे कधी होतो म्हणा?)
आणि मझ्या स्वपनात वेताळ आला माझा क्षणार्धात राजा विक्रम झाला
आणि एक नवा वेताळ आणि विक्रमाची गोष्ट सुरु झाली 
गोष्टितल्या अटी त्याच होत्या की 
राजा तु माझ्या प्रश्नाची उत्तरे नाही दिलीस तर,, 
तुझ्या डोक्याची शंभर शकल होतील आणि तुझ्याच पायाशी लोळन घेतील 
तेव्हा मी सुरु करतो प्रश्न कारण गोष्ट तर तुला माहित आहेच ,,,,
महारष्ट्र देशी साहेबानी आवाज दिला की मुंबई बंद ,
आवाजा सरशी खेळ पट्टी उखडली जात होती, 
अयोध्येची बाबरी पाडली जात होती,
कमलाबाई ला हवी तशी नाचावली जात होती,
बंडखोराना त्यांची योग्य ती जागा दाखवली जात होती,
नव्हे बंडाची भाषाच कुणी करत नसे त्यांची अपार श्रध्हा होती 
भगव्यावर आणि साहेबांच्या विचारांवर,
साहेबाना अटक करायची हिम्मत नव्हती,
अटक केल्यास त्याचे परिणाम काय होतील जाणीव 
प्रत्येक सरकारला होती,
मग आजच ही शिवसेना कुठे गेली?
राहुल येतो मुम्बैत फिरतो 
तेहि लोकल ने? टिकीटासाठी रांग ही लावतो?
तुमच्या नाकावर टिच्चून   
दादरला ही येतो ?
त्याच्या बापाचे होते का ते?
कुठे गेला होता शिवसैनिक काले झेंडे दाखवायचे सोडून?
मार्ग जरी बदले गेले तरी आज प्रत्येकाकडे 
दोन दोन मोबाइल आहेत राहुल ने जर मार्ग बदलला तर 
सहजच अन्धेरिचा सैनिक दादरच्या सैनिकला कळवू शकत होता
राहुल  गाडीनी यायच्या ऐवजी तो रेल्वेने येतोय.
मग त्याने का कळवले नाही?
त्या रेल्वेच्या डब्यात शिव सैनिक नव्हते ?
चल नव्हते,,,
कुणी मराठी ही नव्हते?
त्या कुणालाच वाटले नाही की राहुलच्या किमान 
तोंडावर तरी थुंकावे ?
मुम्बैचा सात बारा तुला कुणी दिला अस का कुणी विचारल नाही?
दादरचे सैनिक घरीच होते म्हने?
दादर तर बालेकिल्ला ना? 
ही मुंबई आमच्या बापजाद्यानी राक्ताच पानी करून ती मिळवलीय 
ती कुणा ऐर्यागैर्याने तिच्या वर हक्क दाखवण्या साठी  नाही ?
असे का विचारले नाही?
अगदी नाही तरी या महारष्ट्र साठी कागदो पत्री किती 
हुतात्म्यानी बलिदान केल हे तरी सांग असा प्रश्न का केला नाही?
मुंबई सारखीच इतर राज्ये ही आहेत 
त्याना हे तु का सांगत नाहीस की ,,
गुजरात भारताचा ,,
मद्रास (सॉरी चेन्नइ )भारताचा ,,
कर्नाटक भारताचा ,,
बंगाल भारताचा ,,
मार खाशील रे राहुल मार खाशील असे का बोलले नाहीत?
ब्रिटीशांच्या सम्राज्या वरचा सूर्य कधी माळवनार नाही 
या गुरमीत त्यांचे राज्यच नाही तर त्यांचा सुर्य ही त्याना 
गुंडालुन इथून जाव लागल कारण?
शिवसेनेच देखिल असच होनार नाही ना?
आपलीच नाती आपली मानस तरी कळपाची मेंढरास भीती
अशी परिस्थिति का झाली?" 
सांग याची उत्तर 
तुला ठावुक असुनही जर मला नाही संगीतालिस 
तर,,,,
राजा विक्रम - वेताला उत्तर याचे मलाच काय 
आख्या महारष्ट्र ला माहित आहे 
पण मी सांगणार नाही भले ही माझ्या डोक्याची 
शंभर शकल झाली तरी चालतील 
कारण,,,
झेंडा तल्या नायकाला जसा प्रश्न पडला होता कोणता झेंडा घेवु हाती?
विट्ठलालालाला  आर्त साद घालत तो विचारतो  कोणता झेंडा घेवु हाती ?
मला मात्र हा प्रश्न कधीच पडला नाही 
मी ठाम होतो माझ्या झेंडयावर  भगवा झेंडा,,
माझी बांधिलकी भगव्याशी,,माझा विट्ठल भगवा  
आता तरी कळल का ? 
मी उत्तर दिल आहे ते शोधायचे काम तुझे 
जातो आता मी माझे झोप झालीय तु तुझ बघ अस म्हणत 
मी त्याचा निरोप घेतला, आणि वेताल स्वतःच डोक खाजवु लागला.  

No comments:

Post a Comment