Sunday, October 17, 2010

' धर्मातर हेच राष्ट्रान्तर '

||श्री नथू रामाय नमः||
स्वातंत्रवीर सावरकरांचे सूत्र 
धर्मान्तर हेच राष्ट्रंतर 
 ह्या  ऐतिहासिक  सत्य्र वस्तु स्थिती वर  
भाषा प्रभु   पु . भा . भावे  यानी  १९६७ मध्ये 
लिहिलेला लेख  त्यांचा  जन्म  शताब्धि निमित्ताने   हिन्दुना  अर्पण,,,,
माझ्या मित्राने ह लेख मला पाठवला
सावरकरांच्या सूत्रानुसार आजही हे ठिकठिकाणी घडताना दिसतय.
सर्वधर्म समभावाच्या झाडाची फळ चाखायला गेलो की हेच पदरी पडणार ,
आज सीमोल्लंघन आहे बराच काळ झाला.
आज वेळ आहे अहिंसेच्या त्या सीमेतुन बाहेर पडायची
आज जर अजुनही नाही बाहेर आलो त्या गाँधी सम्मोहनातुन
तर ,,,,,,,विजया दशमी कशी साजरी करणार?    
परमेश्वरी आम्ही तुला विसरलो !
पमेश्वरी तुला आम्ही तुला विसरलो,

देव देव्हारयात आहेत ,
इंदिराराणी सिहांसनावर आहेत .
यसवंतराव संरक्षण मंत्री आहेत ,
पण परमेश्वरी आम्ही तुला विसरलो .,,,,,,,
तुला कोणी न्याय देऊ सकले नाही .कुणी तुझे संरक्षण करू शकले नाही .
तु कोण कुठली हे ही आत्ता  आमच्या लक्षात नाही.नवी प्रकरणे उपडली . 
नव्या भानगडी निर्माण झाल्या .नव्या नावानी वृत्रपत्रे व्यापली,
तुज्या साठी कुठे जागाच  उरली नाही,
कोण तु ? कुठली ? का म्हणुन आम्ही तुझी आठवण ठेवायची ?
आम्हाला पुष्कळ कामे  आहेत ,
नवे दगड बसवायचे आहेत. नवी उद्दघाटन् करायची आहेत .
नवे नवे प्रश्न आमच्या पुढे आहेत. 
तेव्हा आम्हाला काही तुझे  नाव आठवत  नाही ,कोण तु ? !
तु परमेश्वरी हांडू होय! हा! हा! आत्ता आठवले ,ती सोळसतरा वर्षाची अल्पवयीन कश्मीरी मुलगी , 
जिला गुलाम रसूल नावांच्या मुसलमानाने फूस लावली ,पळविले ,बाटविले आणि तिच्याशी निकाह लावला , 
तीच ना तू ? 
जिच्या साठी मुठभर कश्मीरी पंडितानी चळवळ केली ,बराच अराडाओरडा केला  ,
मार खाल्ला .बायकांची आरक्षीकरवी विटंबना करून घेतली ,
तीच ना तू ? 
हं मग काय म्हणण आहे तुझ ? आम्ही तुला का विसरलो ,हे का तू आम्हाला  विचारत आहेस ! 
काय मुर्खपणाचा प्रश्न ! 
अग मुसलमानानी पळवून बाटवलेली आणि आपल्या घरात घातले ती  तूच का पहेली हिंदु मुलगी आहेस ? 
अग.अशा लाखो मुली होऊंन गेल्या लाखो !आम्ही नाव तर कुणाकुणाची लक्षात  ठेवायची ? 
का महंमद बिन कासिम ने पळविलेल्या सुर्यादेवी  नाव लक्षात ठेवायच का
खिलजीने पळविलेल्या  कमलादेविचे  नाव लक्षात ठेवायच? देवलदेवी नाव लक्षात ठेवायचे ,
का जेठाबाईच नाव लक्षात ठेवायचे . आम्ही ? नाव तरी कुणा कुणाची लक्षात ठेवायची ?
फाळणीच्या  वेळी आणि त्यापूर्वी पळविल्या गेलेल्या कोट्यवधी,
हिंदु बायकांची नाव आम्ही लक्षात ठेवायची अशी का तुझी अपेक्षा आहे ? 
अशक्य .अगदी अशक्य , आम्ही तुझ नाव विसरलो .पार  विसरत गेलो .
विसरायचं नाही तर काय करायच ? 
लाखो नाव लक्षात ठेवायची म्हणजे डोक्याला केवढा ताप ! 
आम्हाला काहि दुसरी काम आहेत की नाहीत ? 
आम्हाला राज्य संभाळआयचे आहे ,गादी टिकवायची आहे ,
स्वताच्या पोटा पाण्याचा  विचार करायचा आहे .
पुन्हा परदेसचे दौरे आहेत ,जेवणे आहेत ,
ह्या सगळ्या भांडगडीत तुझ्या सारख्या क्षुल्लख मुलीचे  नाव आमच्या कस लक्षात राहणार ? 
तेव्हा आम्ही तुझ नाव विसरलो ,साफ विसरलो .
बर का परमेश्वरी ! असेच आम्ही आज वर विसरत आलो आहोत .
उगच का पूर्व बंगाल पापस्थान झाला ,उगच का तेथे मुसलमानांची बहुसंख्या झाली ? 
उगाच का सिंध ,पश्चिम पंजाब सीमा प्रान्त आणि बलुचिस्थान आमच्या हातून गेला ?
अग तिथे तुझ्यासारख्या लाखो मुली पळविल्या गेल्या ,
लाखो ! एकेक करून लाखो ! 
अशी शेकडो वर्षे गेली ,
आम्हाला वाटल आमची एक मुलगी गेली तर काय बिघडले ! 
इका मुलीने आमचे काय वाकडे होणार आहे !????
पण त्या एकीच्या अनेक झाल्या ,शेकडो वर्षात कोट्यवधी मुली गेल्या .
बिन्दुचा सिन्धु झाला ,त्या   सिन्धुनेच आम्हाला बुडवून टाकलं .
संखेच्या त्या सिंधुतच सिंध बुडाला ,पश्चिम पंजाब बुडाला ,पूर्व बंगाल बुडाला आणि सीमा प्रान्त बुडाला .
त्या आम्ही उपेक्षिलेली एकेका मुलीने आमचा असा सूड घेतला ,,,,,,तुही तेच कर!,,,,,,,
उगीच का  ओरडतेश ? उगीच  का आमची दार ठोठावतेस ? 
उगीच  का आमची झोप मोड़ करतेस ? 
तुला एवढ किंचाळयाला काय झाल ? 
आमच्या  इतिहासातील शेकडो वर्ष अशाच किंचाळयानी भरून गेली आहेत .जेव्हा अकबरानी जोधाबाईला नेल, 
तेव्हा काय ती किंचाळली नसेल  ?
जेव्हा फरूख शेखनी इन्द्रकुमारिला नेल ,तेव्हा ती किंचाळली नसेल  ? 
किंचाळल्या ?
त्या ही खुप  किंचाळल्या !आणि गप्प बसल्या .तशी तुही गप्प बैस  ,का उगच आम्हाला त्रास देतेस .'
ठाउक आहे ! ठाउक आहे  ! 
कशमीर हा ए़क काळी हिन्दू प्रदेश होता .संस्कृत ही तिथली भाषा होती .
कल्हण ,विल्हण तिथलेच न , ग ! ठाउक  आहे ठाउक आहे ! 
ते माँर्तडच मोडक मंदिर आम्ही पहिलेल आहे .
अशी मंदिरं काश्मिरात शेकडो होती ,पण आता काय त्याच ! हा सगळा इतिहास झाला .
तो आपण विसरून जायला पाहिजे . 
तुझ्या सारख्या हिन्दू मुली काश्मिरात लक्षावधी होत्या .
तिथे केवळ हिन्दुच होते .पण आत्ता कुठे आहेत  तेथे हिन्दू ? 
अब्द्दुल्ला आंणि सादिक त्यांचेच तीथे राज्य आहे ,
तिथे राज्य मुसलमानांचे आहे .
तेच तिथे बहुसंख्य आहेत .इकडे अल्प संख्य आणि तिथे बहुसंख्य त्याना दुखवून कस चालेल .
तू दुखावालीस तर दुखावालीस ! गेलीस तर गेलीस ! मेलीस तर मेलीस !
दुखावुन दुखावुन तू आमचे करणार तरी काय? 
रडशील  ,ओरडसील आंणि गप्प बससील ,गुलाम रसूल बरोबर मुकाट्याने संसार करू लागशील ,तुला मुलबाळ होतील .
त्यांची नावे महंमद ,अहम्मद ,अब्दुल्ला अशीच असतील .
एका परमेश्वरीच्या पोटी  त्यांचा जन्म आहे हे कुणाच्या ध्यानात राहणार नाही.तुझ नाव निशाण सुद्धा पुसल जाइल.
आज वर आशा कित्येक हिन्दू मुलीच नाव निशाण पुसलं गेलं .
महंमद अहंमद ,करीम आणि रहीम ह्यानी त्याना खाऊन टाकलं .
कश्मिराताल्या हिन्दुच नावं निशाण असंच पुसल गेल. 
पळविलेल्या एकेका पोरीन आमच एकेक कुळ पुसून टाकलं ,
तेवढच तिच्या हातात होत. 
तिच्या उदारातन  तिन नव शत्रु कुळ आकारला आणल .
शत्रुकुळचा अशाच गुणाकार होत राहिला .
आम्ही उपेक्षिलेली एकेक पोरगी हा गुणाकार करीत होती .
वर्षामागून वर्ष जात होती . 
एका पर्मेश्वरीच्या एक लक्ष परमेश्वरी होत गेल्या .त्या दसलक्ष अब्दुल्लाला  जन्म देत गेल्या. 
हे अब्दुल्ला सगळ्या कश्मीर घास घेत होते .
आम्ही आमच्या परमेश्वरीना विसरत होतो .
आणि ,,,,,,,,,परमेश्वर आम्हाला विसरत होतो....
त्याने आम्हाला जे दिलं ,ते तो आमच्या कडून हिसकावून घेत होता.
कारण आम्ही 'आम्ही' राहिलो नव्हतो .
सत्व ,न्याय ,धर्म ,शोर्य .या सार्याना आम्ही पारखे होत होतो .
आमच्या मुली बाळीची ओळख  आम्ही टाकली होती .म्हणून परमेश्वरानी आमची ओळख टाकली.
आम्ही आमच्या गृह्देवाताना विसरलो ,पण देवाची तरी आम्हाला कुठे आठवण होती !
आम्हाला केवळ  स्वार्थाची आठवण होती ! गादीची आठवण .सत्तेची आठवण होती .
पण ती सत्ता पोखरली जात होती .
एकेका परमेश्वरीच्या डोळ्यातून एकेक अश्रु गळत होता ,
आणि त्यात आमची सत्ता सिंहसन विरघडून चालली होती . 
पाण्याचे निरुपद्रवी वाटणारे थेंब असे शेकडो वर्ष गळत राहिले  म्हणजे मोठाले खडकही भिजून नाहीसे होतात .तसेच आम्ही नाहीसे होत होतो
आज  गांधारातून उद्या  सिंध मधून ,परवा सीमा प्रान्त मधून ! 
आमच्या अत्याचारित मुलीबाळीच्या डोळ्यातून  गळनारी आसवेच 
आमचे नाव निशाण पुसून टाकत होती .त्या दीनवान्या आसवात विद्धावंसाचे भयानक सामर्थ्य आहे .
ह्याची आम्हाला कल्पना नव्हती ,
परन्तु पानी झालेल्या हृदयाची अर्करूप  वेदना त्या अश्रुत केन्द्रित झाली होती .
हतबलाचे शाप होते ,अतृप्त इच्छा होत्या  .प्रतिशोधाची थंडगार आग होती .
त्या ओल्या आगीने आम्हाला जाळले ,मारले  ,बुडविले, 
सीमा, सिंध ,गांधार ,पश्चिम पंजाब ,येथे आमचे नाव निशाण उरले नाही .
नाव गाँव गेलेल्या अनेक स्त्रीयानि ते नष्ट केले .
अत्याचारित अबलांची आसवे एकेका थेम्बानी येथे गळत राहिली  आणि त्या आसवानी आम्हाला धुवून काढले .
तेच  ह्या क्षणी काश्मिरात घडत आहे .तिथली नष्टप्राय परमेश्वरी कुठ तरी रडत आहे .
कुठे ते ठाऊक नाही .ती चौकशीच आम्ही कधी केली नाही .
आम्ही पर्मेश्वरिला विसरून गेलो ,परन्तु तिची आसवे आम्हाला विसरली नाहीत ,
ती सारखी टपटप्पा गळतच आहेत . 
हिन्दू विस्म्रुतिच्या .हिन्दू  आत्मघाताच्या आणि हिन्दू अप्रतिकाराच्या नावाने परमेश्वरी रडत आहे .
तिची ती आसवे आम्हाला जाळत आहेत .बुडवीत आहेत .
हिन्दू वंशातले शेवट चे अंकुरही ती कश्मीरातून निपटून  काढीत आहेत ,
परन्तु इथे जगण्या मारण्याची चिंता आहे कुणाला ?
सतरा  वर्षाच्या एका क्षुल्लक मुलीचा विचार करायला इथे कुणाला वेळ नाही .
पर्मेश्वरिला आम्ही विसरलो .
गृह खाते यशवंत राव चव्हाण संभाळीत आहेत.
सिंहासनावर महारानी इन्दिरादेवी विराजमान झाल्या आहेत आणि कोवाळ्या वयाची पळवून नेलेली परमेश्वरी नावाची दीन मुलगी रडत आहे .सारखी रडत आहे .मित्रहो ! सत्य अहिंसेचा आणि इन्दिराजीच्या नारी राज्याचा मोठमोठा ने  जयजयकार करा म्हणजे तिचे त्रासदायक रडणे आम्हाला ऐकू येणार नाही  

No comments:

Post a Comment