Monday, December 12, 2011

१२ डिसेंबर ,रक्त आणि गुलाल

||श्री नथू रामाय नमः||
आजची परिस्थिती ईतकी गंभीर आहे कि
प्रकृती साथ देत नसतानाही अण्णा हजारेंना 

पुन्हा उपोषणाला बसावे लागत आहे.
ते का? याचा जराही विचार न करता,,,
१२ डिसेंबर ला लोक शरद नावाच्या ईसमाला जाणता राजा बनवू पाहत आहेत
मोठ्मोठ्ठले ब्याणार लावून त्याचे वाढदिवस साजरे करत आहे.
खरतर हा दिवस साजरा करायचा असेलेच तर तो क्रांतिकारी दिवस म्हणून साजरा करावा,,,
ईतक या दिवसाच महत्व आहे,,,,
कारण हि क्रांती होती एका सर्व सामान्य माणसाची ,त्याच्या निधड्या छातीची
त्याच्या देशप्रेमाची ,त्या माणसाच नाव होत बाबू गेनू,,,,,,
१२ डिसेंबरलाच श्री. बाबू गेनू यांनी स्वदेशीच्या चळवळीत स्वतःच्या प्राणाची आहुती दिली.
(हो तशी पवारांनीही दिली बरका,,,पण सोनियाचारणी.)
तर,,अत्यंत निर्दयपणे त्या क्रूर सार्जंटने त्यांच्या शरीरावरून विदेशी मालाचा तो ट्रक नेला,,,
रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या पण दुर्दैव असे,,कि ,
"स्वातंत्र्या नंतर या रक्ताचा टीळा लावून देशहिताचे कार्य समर्पणाच्या भावनेतून करण्याऐवजी
स्वतःचे आणि नातेवाईकांचे पोट भरणाऱ्या राजकारण्यांवर गुलालाची उधळण होवू लागली .
आणि या धारेवर सांडलेल्या रक्ताची किंमत संपली."

म्हणूनच श्री. अण्णा हजारेंना उपोषण करावे लागत आहे,
बाबू गेनू कुणी मोठ्ठा पैसेवाला नव्हता, शिकलेलाहि नव्हता,
तथाकथीत बुद्धीमंत तर मुळीच नव्हता, हातावर पोट अशी त्याची अवस्था मारतानाही
कुटुंबासाठी एक छाद्दाम हि ठेवला नाहता.
त्याचाकडे होते या देशाप्रती निर्व्याज प्रेम ,,,,म्हणून तो अजरामर झाला हुतात्मा झाला.
अत्यंत गरिबीत वाढलेला हा मुलगा दोन वर्षाचा असतानाच वडील वारले.
घरातील एकमेव संमपत्ती म्हणजे एक बैल आणि जमिनीचा वितभर तुकडा,
पण काही दिवसातच बैल वारला. आणि श्री. बाबू गेनू यांनी आईसह गाव सोडले मुंबईची वाट धरली.
मोलमजुरीवर कसेबसे जगात होते पण तरीही ,,,
याही परिस्थितीत त्यांच्या मनात स्वदेशीचे प्रेम निर्माण झाले जे काम करायला
भर्ल्यापोटीहि कुणी तयार होत नाहि. तिथे हा प्रत्येक स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी होत असे.
झाल विदेशी मालाची होळी करा असा आदेश आला ,,,
सारा देश त्या आंदोलनात सहभगी झाला मग बाबू गेनू कसा मागे राहील,,,,
त्याला कळल विदेशी मालाने भरलेला एक ट्रक काळबादेवीतून जाणार आहे .
आणि हा पठ्या गेला सगळ्यात पुढे छातीचा कोट करून त्या ट्रकला अडवलं.
पोलीस आले त्यांनी आंदोलकांना हटवले पण बाबू गेनू हटनार्यान पैकी नव्हता .
ते पाहून त्या संतप्त हरामखोर ब्रिटीश पोलिसाने त्या ट्रक चालकाला
बाबू गेनू यांच्या अंगावरून ट्रक न्यायाच आदेश दिला पण ट्रकचा चलाखी हिंदू होता
बलबीरसिंग त्याच नाव त्याने ट्रक अंगावर घालणार नाही असे बजावले त्यावेळी,
तो ब्रिटीश पोलीस स्वतः त्याला खेचून ट्रक सुरु केला आणि तो ट्रक श्री. बाबू गेनू यांच्या अंगावर घातला.,,,,,,,,,
गरीब अर्धपोटी,अशिक्षित बाबू गेनू देशप्रेमाचा धडा आम्हाला शिकवून गेला .
देशाचा नागरिक कसा असावा याचा वस्तुपाठ घालून गेला
आणि आम्ही ?????????
भरल्या पोटी ढेकरा देवून पुढच्या सात पिढ्यांचा उद्धार करणाऱ्यांचा वाढदिवस साजरा करण्यात मश्गुल आहोत?
ज्यादिवशी आम्हाला देशप्रेम काय असते ते कशाशी खातात हे समजेल,,
त्या दिवशी अण्णा हजारेंना उपोषणाला बसावे लागणार नाही ,,,
त्या दिवशी कुट्ल्याही विदेशी कंपन्या पुन्हा भारतात आणून देशाची आणि समाजाची
प्रगती करावी लागणार नाही.

7 comments:

  1. #
    Rohit Bhide, Aditya Borde, Sanket Kulkarni and 8 others like this.
    #
    #
    #

    *
    o Delete Comment...
    o
    o Mark as Spam
    o Report as Abuse...
    Prasad Karkare बाबू गेनू कुणी मोठ्ठा पैसेवाला नव्हता, शिकलेलाहि नव्हता,

    तथाकथीत बुद्धीमंत तर मुळीच नव्हता ------- म्हणूनच
    18 hours ago · UnlikeLike · 2

    ReplyDelete
  2. Sanket Kulkarni कसला जाणता राजा अन् काय?
    एक मात्र नक्की की असली उपाधी त्यांना देणारे लोक पवारांकडून कधीतरी उपकृत झालेले असणार!
    मग या खुशमस्कर्यांनी पवारांना जाणता राजा वगैरे उपाधी दिली यात नवल ते काय?

    जाणत्या राजाच्या राज्यातील अण्णा हजारेंना मग उठसूठ आंदोलनाला का उठावे लागते याचे उत्तर ना जाणत्या राजाकडे आहे ना त्यांच्या खुशमस्कर्यांकडे!

    छत्रपती शिवराय नामक जाणत्या राजाने वेळोवेळी गुन्हेगारांना टकमक टोक दाखवले, आजचा जाणता राजा पद्मसिंह पाटील सारख्या पट्टीच्या गुन्हेगाराला पाठीशी घालतात!

    एक मात्र नक्की, अण्णांचा जनाधार कमी होणार नाही हे जेवढे नक्की तेवढेच मूर्ख मराठी जनता डोक्यावर घेतलेल्या घड्याळाला कधीच खाली उतरवणार नाही हेही तितकेच खरे!

    ReplyDelete
  3. Dwarkanath Surendranath Kulkarni कसला जाणता राजा अन् काय?
    एक मात्र नक्की की असली उपाधी त्यांना देणारे लोक पवारांकडून कधीतरी उपकृत झालेले असणार!
    मग या खुशमस्कर्यांनी पवारांना जाणता राजा वगैरे उपाधी दिली यात नवल ते काय?
    14 hours ago · UnlikeLike · 2

    ReplyDelete
  4. Aditya Borde खरा सांगू का सुनील राव ?
    हा देश अत एक मोठ्या संक्रमानातुंन जातोय . लवकरच भारतात पुन्हा राज्यक्रांति होण्याची चिन्हे मला स्पष्ट दिसतायेत .
    त्या दृष्टिन्ने अता आपण तयार राहू या
    14 hours ago · UnlikeLike · 2

    ReplyDelete
  5. Sanket Kulkarni Aditya Borde

    एकदम बरोबर आहे!
    राज्यक्रांतीची लक्षणं तर स्पष्ट दिसताहेतच;पण त्याहीपुढे जाऊन म्हणावेसे वाटते की बस्स झाली लोकशाही आता येऊदेत हूकूमशाही!
    13 hours ago · LikeUnlike · 1

    ReplyDelete
  6. #
    Sunil Bhumkar aadity agadi tu bolalas tasech hovo .
    about an hour ago · LikeUnlike

    ReplyDelete
  7. बरीस्तेर नाथ पी एकदा लोकसभेत भाषण करताना म्हणाले होते की खस्ता कोणी खाल्या ,सत्कार कोणाचे होत आहेत , फासे कोण गेले हार कोणाच्या गळ्यात पडत आहेत ? सारेच अतर्क्य आहे .

    ReplyDelete