Tuesday, May 1, 2018

आज महाराष्ट्र दिन,,,पण

||श्री नथुरामाय नमः ||
जागतिक आश्चर्यात मोजल जावं अस राज्य
*जगाच्या पाठीवर एकमेव अस देशाच्या पोटात एक राज्य आहे जे महाराष्ट्र आहे*
जगाने अभ्यासावेत असे शिवराय याच मातीत जन्मले
भक्तीचा मळा जरी कर्नाटक केरळात फुलला असला तरी इथे ज्ञानदेवे रचिला पाया त्यावर तुका झालासे कळस अशीच परिस्थिती म्हंटली पाहिजे
हे संतांचे साधूंचे क्रांतीचे निष्ठावनतांचे मर्द मराठ्यांचे आणि प्रसंगी हिमालयाचे देखील रक्षण
करणारे अटकेपार विजयी जरीपटका फडकवणारे कर याच करांनी
*देशाला ठणकावून सांगितलं की या देशावर राज्य करायची लायकी पात्रता कुणाची असेल तर
आमची महाराष्ट्राची,,*
परंतु
*दुर्दैवाने देशाला परदस्यातून सोडवण्याची धमक असणार हे राष्ट्र आज आपल्याच मराठी बांधवांच्या बाबतीत जे कर्नाटकात 865 गावात
डाम्बला गेलेल्या कोंडला गेलेल्या मराठी बांधवांच्या बाबतीत नेमकं उदासीन आहे*
जसा राजा तशीच प्रजा
किंवा जशी प्रजा तसाच राजा कसही म्हणा,,
परंतु हा करंटेपणा करण्याआधी
मुंबई महाराष्ट्राला याच सीमावसीयांमुळे मिळाली
बेळगाव कारवार सह मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे अशी घोषणा याच सीमावसीयांनी दिली
परंतु
*अल्प संतुष्ट मराठी बांधवाने करंटेपणा दाखवला*
ठीक आधी ,,
*मुंबई तर ताब्यात घेऊ म्हणत आधी पोटोबा मग जमलं तर विठोबा ही भूमिका सुद्धा तो परस्पर विसरला*
आणि आजच्या या घडीला मुंबईस्थित मराठी माणसाला सीमाप्रश्न म्हणजे काय?
तर त्याचा प्रतिप्रश्न येईल काय कसला सीमाप्रश्न?
अच्छा तो कश्मीरच काय ते लाईन ऑफ कंट्रोल की काय ना? अस काही असम्बन्ध उत्तर आजचा मराठी माणूस देईल
परंतु लक्षात घ्या कश्मीरपेक्षाही ज्वलंत अत्यन्त खरा आणि महाराष्ट्राचा हा सीमाभाग महाराष्ट्रात आला तर महाराष्ट्राच्या महसुलात वाढच होणार आहे
यापरही तुलना करायचीच झाली तर,,
*गेली 65 वर्ष काश्मीरला आपण पोसत आहोत*
*तिथे जवान राजरोस मारच खात आहेत*
*वर्षाचे 365 दिवस तिथे कायदा मोडला जातो*
*जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलासकट सारेच दहशतवादी आतांकी आहेत*
*या देशात फुटीरतावाद्यांना पोसतय सरकार*
*त्यांना या देशाचे कायदे अमान्य आहेत*
*नव्हे नव्हे त्यांना कश्मीर स्वतंत्रच हवा*
अशी अनेको कारण आहेत तरीही
वैशिष्ट्य हे की *सरकार या फुटीतावाद्यांशी बोलत चर्चा करत सवलती देत वर त्यांचे रोज शिव्या ही खात*
आणि नेमकी उलट परीस्थित इकडे सीमाभागात
*गेली 65 वर्ष तिथला मराठी माणूस फक्त अन्यायच सहन करतोय*
*मराठी माणसाला कानडी येत का असा मुलीचा बापच नवऱ्या मुलाला आगतिकतेने विचारतो कारण परिस्थिती अशी की कानडी आलं तर नव्हे ते आलंच पाहिजे असा आग्रह आहे तरच तुमच्याशी व्यवहार होतात तुम्ही पोट भरू शकता*
*तिथला प्रत्येक मराठी हा व्यवसायिकच आहे*
*शाळाच मुळी कानडी आहेत*
*आशा परीस्थित या साऱ्या जुलमाला ते गेली 65 वर्ष प्रतिकार करत आले आहेत*
*3/4 पिढ्या होतील आता ते मराठी मुलाखत यायचा प्रयत्न करत आहेत*
*ते वेगळं मराठी राज्य द्या अस नाही बोलत ते म्हणतात आम्ही मराठी आहोत आम्हला फक्त आमच्या मराठी मुलखात विलीन करा*
*65 वर्ष ते कानडी सरकारचा फक्त मारच खात आहेत*
*व्यापार मराठी माणसाचा व्यापार महापालिका वर झेंडा मराठी आणि तरीही ,,,,*
*65 वर्षे न्यायालयाच्या चकरा मारत या आशेवर ते जगत आहेत की कधी तरी आम्ही आमच्या आईच्या कुशीत जाऊ पण नाही,,*
*मराठी बांधवांच्या महसूलावर कर्नाटक राज्य चालत एका अर्थी तिथला मराठी माणूस कानडी सरकला पोसतो आहे*
*वर आमच्या या कथित प्रतिकरला आम्ही सनदशीर म्हणून स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेतो*
*यासाठी महाराष्ट्रात जात नाही तो पर्यंत मी चप्पल घालणार नाही,,मी लग्नच करणार नाही,,मी दाढीच करणार नाही,,मी शेंडीची गाठ सोडणार नाही अशा भयंकर पितामह भीष्मांना देखील लाजवतील अशा आर्य चानक्की शपथा गेली 65 वर्ष पाळत आहेत त्यांच्या भागीरथी प्रयत्नाना सलाम करावा तितका कमीचज*
*वर मुंबई महाराष्ट्रातील मराठी निलाजरेपणे बोलतो की आता कशाला पाहिजे इकडे इतकी वर्षे काढली ना अजून कानडी येत नाही ? रहा की तिकडेच,,,*
*अरे आज महाराष्ट्र् दिनाच्या शुभेच्छा देण्याआधी मेलेल्याच्या टाळूवरच लोणी खाणार्या औलादीची तर आपली जात नाही ना हे आधी तपासून घ्यावी आणि हो हिंदुत्ववाद्यांनो हेसारे कानडी मुलखात जबरेने डांबले गेलेले मराठी बांधव हे कट्टर हिंदुत्वनिष्ठ आहेत हे पक्के लक्षात घ्या*
या पुढे
*बस्स झाली बोलणी बस्स झाले हेवेदावे*
*रडल नाही पोर तर आई देखील दूध पाजत नाही*
*मार्ग बदला यातच हित आहे*
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर

No comments:

Post a Comment