Friday, December 23, 2011

कनसे,,,आणि पेडगावचे शहाणे, कनसे ,,,(कर्नाटक नव निर्माण सेना )

||श्री नथुरामाय नमः ||
प्रती,आदरणीय ,

कर्नाटक नव निर्माण सेना संस्थापक,,
श्री. राजकुमार ठाकरे साहेब आणि त्यांच्या विचारांचे खंदे समर्थक अर्थात सारे पेडगावचे शहाणे,,,,
जय कन्नड ,,,
कालपरवा पासून सारा महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या विधानाचा समाचार घेत आहे.
राज ठाकरेंनी निदान आता तरी नवनिर्माणाची स्वप्न पाहण् सोडून द्यावी नवनिर्माणाच्या नावावर ईथे विदेशी कंपन्या, मॉल आले तर ते चालतात.पण स्वतःचा गाडी ,बंगला ,व्यापार आणि महसूल घेवून येणारे मराठी बांधव नाही चालत....?
असो त्यांची राजकीय गणित काय असतील ती असोत पण
बेळगाव कारवर कर्नाटकाच्या विरोधात बंदचे आवाहन करणारे तुम्ही तुमच्याच
मन सैनिकांना तुम्ही आता काय सांगणार?
मला ईथे कन्नड मत हवीत तिकडे मराठी मारतोय तर मरूदे?
"बेळगाव जर भारतात आहे तर बाबांनो ,,,
कर्नाटक तामिळनाडू च्या पाणी प्रश्नात
हे पाणी भारतातच आहे ना? अस जरा
कर्नाटक तमिळनाडूच्या लोकांना सांगा कि,,,,?" तिथे का गप्प बसता ?
आणि तुम्ही सांगितलं तरी ते ऐकणार आहेत का?
काश्मीर मधल्या मुसलमानांना सांगा काश्मीर भारतात आहे ,,
तिथल्या काश्मिरी पंडितांना का विस्थापित करता ते हिंदू
भारताचे नागरिक आहेत.
कुणीही ऐर्यागैर्याने उठाव आणि महाष्ट्राला उल्लू बनवावा काय ?
सांगा,राजकुमार ठाकरे साहेब?, तुम्हाला जेवढ मराठी प्रेम आहे तेवढच!!!!,
कदाचित त्यापेक्ष्या सुधा जास्त आम्ही मराठी अभिमान आणि मराठी अस्मिता बाळगतो.तुमचा प्रक्टीकॅल विचार गेला चुलीत...
तिथे बसून बोलण्यापेक्षा जर तुम्ही इथे येवून मराठी माणसाची साथ दिली असती तर बर झाला असत पण जस तुम्हीच म्हणाला कि जिथे राहता तिथली भाषा आली पाहिजे
मग तुम्ही तुमचा पक्षाची शाखा इथे बेळगावात का काढली???
तुमचा काहीही अधिकार नाही इथे तुमची शाखा ठेवण्याचा!!!
जे तुम्ही बोलत आहात ५६ वर्षे हा प्रश्न ताटकळत आहे आम्हाला सांगा तुम्ही काय करत आहात?
एकीकडे तुमचीच माणसे बस फोडतात, बंद करतात
आणि तुम्ही तुमच्या भाषणात सांगता कि असे बंद करून काही चालत नाही म्हणून?
२५ लाख सीमावाशी जर महाराष्ट्रात आले तर त्यांना सुविधा पुरणार नाहीत?
मग तुम्ही पक्ष काय मते फोडण्यासाठी काढला आहे का?
आता तुमचा पक्ष फक्त पक्ष राहिला नसून तो एक Information beauruo झाला आहे.
इथली माणसे खुर्चीसाठी लढत नाहीत राजकुमार ठाकरेसाहेब...
ह्याचा तुम्ही थोडा भान राखावा...! आणि तुम्ही कृपा करून कुणालाही भेटण्याचे कष्ट घेवू नये
कारण महाराष्ट्राताली राजकारणी मंडळी म्हणजे सर्व एकाच माळेतली मणी आहेत.....!
तुम्ही तुमचा पक्ष हा महाराष्ट्र पुरता सीमित आहे हे सिद्ध केलं आहे
त्यामुळे ह्या पुढे तुम्ही तुमची शाखा इतरत्र कुठे काढण्याचा विचारही करू नये ..
आणि बेळगावात तरी नाहीच नाही....!
आम्हाला शिवरायांच्या महाराष्ट्राचा गर्व तरी आहेच पण माज आहे आम्हाला मराठी असल्याचा.....!
संयुक्त महार्ष्ट्राच्या वेळी "आधी लगीन कोंढाण्याचे म्हणत
सीमा भागाला उल्लू बनवलं बिचारा रायबा आता कोंढाण्याचे
लगीन होईल मग आपले नक्की या आशेवर आजही तो
गुढग्याला बाशिंग बांधून उभा आहे कधी तरी मी महाराष्ट्रात जाईल,,,
ह्या आशेवर,,,ईकडे कोंढाणा खावून पिवून माजला,
सत्ता भोगून उताणा हि झाला आणि महार्ष्ट्राच्या त्या मंगल
कलशावर ,,महारार्ष्ट्राचा सुवर्ण महोत्सव साजरा देखील केला.
आणि रायबा तिकडे म्हाताराही झला पण,,,
आज हि त्यांची तिसरी पिढी त्याच जोमाने लढा देतेय महारष्ट्रात येण्यासाठी हे पक्क लक्षात ठेवा आपण आज सुपात आहोत ते जात्यात कदाचित उलटही घडल असत ,,,,मोरारजी देसाईच्या कृपेने

आपण कदाचित आज गुजरात मध्ये खितपत पडलो असतो किंवा १०५ हुतात्म्यात आपलाही नंबर लागला असता,किंवा कदाचित आपलाही हा लढा ५६ वर्षाचा झाला असता आणि मग कदाचित बेळगाव मधील काही नतद्रष्टांनी आपल्याला सांगितलं असत गुजरात भारतातच आहे नां? शिका गुजराती,, ईकडे कश्या येतंय आम्ही सुखी आहोत आमच्या सुखात बिब्बा कालवायचा विचार आहे का? चला पळा तिकडे ,,,
भिकारडे साले काय आहे तुमच ईकडे आम्हाला आमची धुनी धुता येत नाहीत त्या गुजरात्यांकडून काही शिका .


आपण आज काही हालचाल नाही केली तर नरकात सुद्धा जागा मिळणार नाही ,,,,,
कोल्हापूरच्या पलीकडे कोणत्याही मराठीचे रक्त स्वतः च्या राक्ताबंधावांचे हाल बघून सळसळत नाही.
विदर्भात तर, " बेळगाव कुठे आहे", इथपासून सुरुवात होते.पण ,,,
आमच्या लक्षात आले तुम्हाला
स्वभाषा,स्वधर्म ,आणि स्वराज्य यांच्याशी काहीच
घेन देन उरलेल नाही.तुम्ही सारेच
पेडगावचे शहाणे अर्थात दुहिच्या शापाचे पाहिले मानकरी आहात.


5 comments:

  1. राम प्रहार नाही हा तर तुमचा "सणसणीत प्रहार "...

    Prashant Naik
    9:36pm Dec 23
    राम प्रहार नाही हा तर तुमचा "सणसणीत प्रहार "
    कमीत कमी शब्दात उल्लेखनीय असा लेख.
    तुमच्यासारखे पाठीशी आहेत मग राज सारख्या नेत्याची गरज नाही
    जय महाराष्ट्र !

    ReplyDelete
  2. Tya Rahul Raj la sodla asata Krushkunj var tar...

    Jaydeep Jadhav
    12:57pm Dec 23
    Tya Rahul Raj la sodla asata Krushkunj var tar bare zale aste , tyala marnare marathi policech hote - raj thakreni kiman hetari lakshat thevave :)

    ReplyDelete
  3. Jaydeep Jadhav
    12:52pm Dec 23
    malatari vatte ki shivsena , MNS he sarv rajkaran karat ahet ya vishyache - Pan mazya mate purn maharashtratil marathi manus ajunhi belgaon la maharashtrat samjato - tyamule tension gheu naka - atta raj thakrena 1000 lokpan jamnar nahit - tyani marathi hruday todale ahe

    ReplyDelete
  4. tyanantar tond kase gapp zale tyanche ;)

    Jaydeep Jadhav
    12:55pm Dec 23
    tyanantar tond kase gapp zale tyanche ;)

    ReplyDelete
  5. Sunil Bhumkar
    12:49pm Dec 23
    हो पण विरोध हा झालाच पाहिजे हे आज असे बरळत आहेत कि मुंबईसह महाराष्ट्राचा सोड सीमाभागाचा हि ७\१२ आपल्याकडेच आहे ,,

    ReplyDelete