Saturday, September 10, 2016

मलेरिया,श्रीलंका आणि टवाळखोरसरकार,,,

||श्री नथुरामाय नमः||

मलेरिया,श्रीलंका आणि टवाळखोरसरकार,,,

आजवृत्तपत्रात बातमी वाचली श्रीलंका हि मलेरिया मुक्त झाली आहे,
जागतिक आरोग्य संघटनेने या देशाला मलेरिया मुक्त असल्याचे प्रशस्तीपत्रक दिले आहे,,,
आणि गेले काही दिवस जाहिरात लागते टीव्हीवर स्वच्छ भारत मिशनची,, लोकांच्या पैशाने लोकांचीच टिंगलटवाळी उडवली जातेय अत्यन्त राजरोसपणे ते सरकारच्या माध्यमातून😡😡
इथे जे उघड्यावर बसतात शौचाला
त्यांचं समर्थन नाही करायचं पण,,
त्यांची टवाळी उडवन्यात जो जाहिरातींवर वारेमाप पैसा उधळला जातोय तो त्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीकडे
वळवला तर खरच हा देशही सर्वरोगमुक्त होईल यात शंका नाही,,
जस आज ते श्रीलंके ने करून दाखवलं,,
वास्तविक डेंग्यू, मलेरिया, चिकणगुनिया या सारख्या रोगांचे माहेरघर असा हा देश तिथलं वातावरण या साऱ्याला पोषक,,
या अशा वातावरणात डासाला नष्ट करणे अवघड पण त्यांनी ते करून दाखवलं जनतेची टवाळी न उडवता,,
आपण आरोग्याबाबती किती दक्ष आहोत हे त्यांनी दाखवून दिलं 
मालदीव सारख्या देशहि मलेरिया मुक्त आहेसमुद्र डोंगर जंगल ऊन पाऊस हे डासां साठी उपकारकच तरीही आज ते मलेरिया मुक्त आहेत.
आणि आपल्यकडे फक्त विरोधक म्हणजे डास चिलट त्याला कस नष्ट करता येईल हेच पाहिलं जातं
२००० मध्ये या देशात मलेरियाचे सुमारे एक लाख रुग्ण होते आणि आज 2007 नन्तर एकही माणूस मलेरियाने दगावलेला नाही.
अनेक प्रसंगातून हाही देश गेलेला आहेच,,
परंतु भारत हा जगातील एकमेव देश असेल जिथे शाळेत घोकँपट्टी करून शिकवलं जातं आणि त्याला मार्क हि दिले जातात 
उघड्यावरील अन्न पदार्थ खाऊ नयेत
अस्वच्छता आणि गॅलिच्छपणा हि या देशाची संस्कृतीचं आहे की काय असं बरेचदा वाटत,,
स्वातंत्र्य पूर्वकाळात प्लेगने उच्छाद मांडला त्यांनतर नारू पोलियो देवी या रोगावरही आपण विजय मिळवला
त्यातही पोलियोचे औषध खेडोपाडी पोहचवणे अवघड ती लस एका विशिष्ठ तापमानातच ठेवावी लागते
आणि तरीही आपण बराचसा विजय मिळवला आहे देवीची तर आपण जाहिरात केली ,, देवीचा रोगी कळवा शंभर रुपये मिळवा,,
अगदी तिकडे नांदेड जिल्ह्यातील सुमारे 150 गाव डास मुक्त झाली तेथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून सगळ्या गावांमध्ये हजारो शोषखड्डे घेण्यात आले आणि डासांच्या निर्मितीस पोषक वातावरणच राहणार नाही अशी व्यवस्था केली
असा प्रयोग खरं तर देशभर राबवला गेला पाहिजे परंतु त्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती असणे आवश्यक परंतु ज्यांचा उद्देश फक्त स्थानिक पक्षांच्या सत्ता हस्तगत करायची आणि नन्तर त्यालाच हिंवण्याचे हिणकस उद्योग करत राज्य करणं हाच ज्यांच्या उद्योग त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय??
याबाबतीत श्रीलंकेचे अभिन्नदन करावे तितके कमीच
विकास म्हणजे फक्त उद्योगधंदे नव्हे,,
विकास म्हणजे रस्ते पूल हे बंधने नव्हे,,
विकास म्हणजे सगळीकडे मॉल
उंच उंच काचेच्या बिल्डिंगज बांधणे नव्हे,,
विकास म्हणजे
देशातील प्रत्येक नागरिक रोगमुक्त कसा राहील ,,
त्याने बाळसं धरण तेही योग्य वयात म्हणजे विकास,,
विकास म्हणजे चायवाल्याचा सिमवाला होणं नव्हे,,
विकास म्हणजे अंबानीला सूट देणे नव्हे,,
विकास म्हणजे KEM  सारख्या 
हॉस्पिटलची ताकद वाढवणे
स्वातंत्र्याच्या साठ वर्षांनंतरहि आंम्हला विकास म्हणजे काय हे कळणारच नसेल तर देव पर्रमेश्वर ईश्वर जीजस अल्ला आपलं काय करायचे ते तोच ठरविलं
आमीन जय चिंगाबुंगा
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर                        
 Sri Lanka Is Declared Malaria Free by World Health OrganizationSri Lanka on Tuesday became the third and most populous country in Asia to be declared malaria-free by the World Health Organization.blogs.wsj.com

https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=newssearch&cd=2&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwjL_cKLl4XPAhXDRo8KHYHEB6QQqQIIJygAMAE&url=http%3A%2F%2Fblogs.wsj.com%2Findiarealtime%2F2016%2F09%2F06%2Fsri-lanka-is-declared-malaria-free-by-world-health-organization%2F&usg=AFQjCNEc8iRBQTm4Wjpe2ya995YQQ6uR9Q&sig2=63Sjj8sk-5SPu4f7q0lzKQ

No comments:

Post a Comment