Thursday, March 17, 2011

ते वर्ष होत १९९९ ,,,,,,,,

  ||श्री नथू रामाय नमः||
परवा असाच मित्रांमध्ये गप्पा मारता मारता
क्रिकेटचा विषय निघाला मी जरा घुश्यातच होतो
जरा मोठ्याने बोललो अरे काय चाललाय काय?
क्रिकेट खेळन तेहि वैयक्तिक स्वार्थासाठी
लाखो करोडो (मला ईतकेच शब्द माहित आहे)
रुपये कमावण्यासाठी, जाहिरातीत झळकण्यासाठी ,
स्वतःचे वैयक्तिक विक्रम नोंदवण्यासाठी,,,,,,,,,,?
आणि ईतका सार करून वर यांच्या नावावर सट्टा बेटिंग
आहेच चालू यातले काही महाभाग याचा फायदा उठवून बक्कळहि पैसा कमावतात.
म्हणजे पाहणार्याला हातोहात मूर्ख बनविल जात,
सटोडिये ठरवतील तस कुणी तरी आउट होतो,
कुणी रन्स काढतो, कोण आल्या आल्या परत जातो,
आणि आपण,,,,,,,,,,,?

आणि,,,

आठवलं ते १९९९ वर्ष ,, कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक बळी घेणारा ,
कपिल देव..... आणि अजय जडेजा ...
काश्मीर भेटीवर गेले होते ,
काही सैनिकी छावण्यांना त्यांनी भेटी दिल्या ,
तिथल ते वातावरण पाहून ते भारावून गेले ,
कारगिल संघर्षाला सुरवात झाली होती,
गस्तीवर गेले सैनिक परत आले नव्हते,
काही मृतदेह आले होते विदृपावस्थेत ,,,,
काहींचे डोळे काढलेले ,जीभा छाटलेल्या ,
काहीना केवळ सिगारेटच्या चटक्यांनी मारलेल,
हे सर्व पाहून त्यावेळी,,
कपिल देव म्हणाले,,,,?
"भारताने पाक बरोबरचे क्रिकेट संबंध तोडून टाकावेत
भारतातच नव्हे तर ईतरत्र हि भारताने पाक बरोबर क्रिकेट खेळू नये,,,
पाकला प्रथम कसं वागायचं ते शिकू द्या,,,
मग भारताने ठरवावं त्यांच्याशी संबंध ठेवावे कि नाही ,,,
ईतकच नव्हे तर टोरांटो येथे हि सहारा चषक मध्ये भारतान खेळू नये,,
आपले जवान सीमेवर प्राणाची आहुती देत असताना,,
घुसखोरांशी लढत असताना ,,,
भारताने त्यांचाशी क्रिकेट खेळणे अत्यंत वाईट,
आपल्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या जवानांसाठी आपण एव्हड तरी नक्कीच केलं पाहिजे .
त्यांना साथ न देता केवळ करमणुकीच साधन म्हणू आपण
क्रिकेट खेळत राहिलो ,,,तर आम्हाला ,,?
सच्चा भारतीय म्हणवून घेण्याचा अधिकार नाही ,,,"
आज कारगिल संघर्ष संपून १२\१३ वर्षे झाली,,,
पुलाखालून बरेच पाणी वाहून हि गेल .
कारगिल नंतरहि अनेक बडे हल्ले पाकड्यांनी
केले,सामान्य नागरिक बळी जाताच राहिले,,,,
अगदी २६\११ ला १०० कोटींच्या या देशाला तर त्यांनी
पार हादरवून सोडले ,,,,,
त्यांनी न घुसखोरी थांबवली न आपली वृत्ती बदलली ,,
पण आम्ही त्यांच्याशी खेळतच आहोत आणि पुढे हि खेळू ,,,,,,
त्यांच्या नट नट्यांना आमंत्रित करतच आहोत ,
संगीतकार गायक यांना बोलवतच आहोत,
अफजल गुरु आणि आता कसाब यांना पोसतच आहोत,
आणि हे सार कशासाठी तर क्षणभराच्या
मौजेसाठी पैशाची लालसेपायी,,,,,,,,?
आमच्या जाणीवा ईतक्या बोथट आहेत ?
कि देशाचे न्यायमुर्तीही काल सचिन च उदाहरण
देवून बसले ,,,,,,
सचिन ग्रेट असेल नाही आहेच पण म्हणून,,,,
त्यानेही क्रिकेट खेळताना जराही विचार करू नये,,,?
का देशा पेक्षा क्रिकेट महत्वाचे?




1 comment:

  1. *
    *
    Aditya Borde likes this.
    *
    o
    Aditya Borde सुनील राव तुमचा लेख वाचला . फार सुन्दर लिहिता तुम्ही .
    तुम्ही म्हणता त्या गोष्टीत बरेच तथ्य आहे . यात वाद नाही. हा विचार आपण सगले मिळून केला पाहिजे .

    ReplyDelete